नियमाची पायमल्ली करून परवानगी देण्यात आलेल्या दारू दुकानांची परवानगी रद्द करा : मनोज पाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमाची पायमल्ली करून परवानगी देण्यात आलेल्या दारू दुकानांची परवानगी रद्द करण्याची मागणी मनोज पाल यांनी केले आहे.
2021 मध्ये राज्य शासनाने दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व नियम पायदडी तुडवित दारू दुकानांना परवानगी देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात संताप व्यक्त होत आहे.असाच प्रकार बंगाली कॅम्प परिसरात चालू आहे.
राज्य शासनाने निर्धारित केलेले नियम व सर्व कागदपत्रे योग्य असल्यास परवानगी द्यावी. नोंदणीकृत शैक्षणिक, धार्मिक संस्था, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा या पासून अंतर असने गरजेचा आहे. परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करून सुद्धा नवीन दारू दुकानांना परवानगी देण्यात येत आहे.
मा.पालकमंत्री, मा.जिल्हाधिकारी व मा. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना निवेदन देऊन सुद्धा कारवाही होत नाही यानंतर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
News - Chandrapur