बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील पाणी पुरवठा सुरळीत सुरु
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापुर मध्ये मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद होते, ते आता सुरळीत सुरू झाले आहे. त्याबद्दल युवक काँग्रेस ने विसापूर ग्रामपंचायत चे आभार मानले.
विसापूर ग्रामपंचायतचे पूर्व नियोजन नसल्यामुळे पाणी पुरवठा बंद झालेले होते. त्यानंतर इतक्या तपत्या उन्हात नागरिकांच्या घरी पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. त्यांना विकत चे पाणी घ्यावा लागत होते. याबाबत युवक काँग्रेस कमिटी च्या माध्यमातून सूचना दिले होते, कि तात्काळ नियोजन करून बंद झालेले पाणी पुरवठा सुरु करण्यात यावे. युद्ध पातळीवर विसापूर ग्रामपंचायत काम करणे सुरु केले. तसेच आज पासून पाणी-पुरवठा सुरळीत सुरू झाले आहे. या करीता प्रितम पाटणकर सचिव बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस यांनी आभार मानले आहेत.
News - Chandrapur