१० वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ १० वी चा निकाल किंवा एसएससी परीक्षेचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर करण्याची शक्यता आहे. मे महिन्यात महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर होऊन काही दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे रिझल्टचे टेन्शन वाढले आहे.
महाराष्ट्र एसएससीचा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर केला जाईल. पण निकालाच्या तारखांबाबत सूत्रांकडून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र हा निकाल याच आठवड्यातच जारी केला जाईल अशी माहिती दिली आहे.
२ ते २५ मार्च दरम्यान १० वी ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कधी लागणार याची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्र बोर्डच्या mahresult.nic.in आणि mahahsscboard.in. या वेबसाईटवर जाऊन निकाल चेक करता येणार आहे.
News - Rajy