शासन आपल्या दारी अंतर्गत
-गटई कामगारांना पत्र्यांचे वाटप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : १५ मे ते १५ जून या कालावधीत शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने गटई कामगारांच्या आर्थिक उन्नतीसाठी पत्र्यांचे स्टॉल वाटप करण्यात येत आहे.
चामड्यांच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसून आपला व्यवसाय करत असतात. गटई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे. तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरीता १००टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालू वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला. (तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र) शाळा सोडल्याचा दाखला. रेशन कार्डची झेरॉक्स प्रत आधार कार्डची झेरॉक्स प्रत. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे. ती जागा ग्रामपंचायत,नगरपालिका, महानगरपालिका व छावणी क्षेत्र (कन्टॉटमेंट बोर्ड) यांनी भाडयाने, खरेदीने, स्वमालकीची असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी क्षेत्राची सांक्षांकीत प्रत.
योजनेसाठी इच्छुक लाभार्थी असतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय योजना (www.mahabany.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रणालीत अर्ज भरुन त्याची एक प्रत या कार्यालयात सादर करावी असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.
News - Nagpur