महत्वाच्या बातम्या

 शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत


- कृषी आरोग्य विभागाच्या योजनांना गती  

- लोकप्रतिनिधींचा सक्रीय सहभाग

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : १३ मे रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  शासन आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ केले. हळूहळू त्याचे सकारात्मक चित्र ग्रामीण भागात उमटतांना दिसत आहेत. कृषी विभागाने गाव, मंडळस्तरावर शिबीर घेऊन शेती विषयक योजना, साहित्य वाटपासह खते, बियाणे, किटकनाशके आदीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली आहे व निरंतर मार्गदर्शनाची प्रक्रिया सुरु आहे. सोबतच आरोग्य विभागाने ग्रामस्तरावर शिबीराच्या आयोजनातून ग्रामीण आरोग्यावर भर दिला आहे.

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर जिल्ह्यातील गावस्तरावर क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत बैठकीचे आयोजन करुन योजनेबाबत माहिती व महाडिबीटी पोर्टलवर अर्जाची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. कृषी विभागातील सर्व योजना मिळून संभाव्य २४ हजार ८७८ लाभार्थी असून आतापर्यंत कृषी सहाय्‌यक व पर्यवेक्षक यांचे मार्फत १७ हजार २५३ लाभार्थ्यांपर्यंत संपर्क झालेला आहे. त्यापैकी ३ हजार ९२२ शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नोंद केली आहे. त्यापैकी ५०५ लाभार्थ्यांची महाडीबीटी मार्फत निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना-प्रती थेंब अधिक पीक योजनेंतर्गत ९९८ लाभार्थ्यांची निवड तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत १ हजार २३५ लाभार्थी निवड झाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान (कडधान्य, भात,गहू, कापूस गळीतधान्य) अंतर्गत ३५० तर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत १ हजार ३३९ लाभार्थी असे एकूण ३ हजार ९२२ महाडिबीटी पोर्टलवर नोंद घेण्यात आली आहे.   

सदर अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान काटोल येथे राबून योजनेंतर्गत लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हार्वेस्टर व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. पारशिवनी तालुक्यातील करभांड येथे शासन आपल्या दारी अंतर्गत आमदार आशिष जायस्वाल यांच्याहस्ते आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्षाने शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याशिबीरात निशुल्क नेत्र तपासणी, मोतिबींदू तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबीराचा लाभ ३२८ व्यकतींनी घेतले. 

सावनेर तालुक्यातील पाटणसांवगी येथे जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते शासन आपल्या दारी अंतर्गत दोन दिवशीय शिबीराचे उद्घाटन करण्यात येवून शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

सावनेर तालुक्यातीलच खापा येथे शिबीरात कृषी विभागातर्फे १९ शेतकऱ्यांकडून मातीचे नमूने गोळा करण्यात आले. मग्रारोहयो, पीएफएमई,महाडीबीटी अंतर्गत २९ अर्ज भरण्यात आले. कृषी अभियानांतर्गत ट्रॅक्टर अनुदानाची कार्यवाही करण्यात आली. सोबतच कृषी विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.

मौदा तालुक्यातील गोवरी येथे आमदार टेकचंद सावरकर यांच्याहस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये घरकुलाचे नमूने, रमाई घरकूल अर्जाचे वाटप करण्यात आले.लाभांच्या योजना तसेच शासकीय वाटपाच्या योजना यावर भर देत शंभर टक्के लाभार्थ्यांना लाभ देण्यावर भर देण्यात येत आहे. यंत्रणा कार्यालय सोडून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे काम करीत आहेत.  

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनाही अधिका-यांच्या या मोहीमेतील कामगिरीचे मूल्यमापन करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पाऊस पडण्यापूर्वी १५ जूनपर्यंत कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात या सार्वजनिक कामांच्या लाभासाठी यंत्रणा तत्पर झाली आहे.

प्रामुख्याने या योजनांवर दिला भर जात आहे :

१५ एप्रिल ते १५ जून या कालावधीतील शासन आपल्या दारी या उपक्रमात अत्यंत गरीब घटकातील लाभार्थी लाभान्वित व्हावा यासाठी अंत्योदय हा उद्देश ठेवण्यात आला आहे.  अनेक योजनांवर भर दिला गेला आहे. यामध्ये वैरण बियाणे वाटप, पशुसंवर्धन विषयक पशुखाद्य वाटप, शेळीगट वाटप, दुधाळ जनावरे वाटप, शेळीगट वाटप, पक्षीगृह बांधकामासाठी निधी, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना तसेच महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, संत रोहिदास चर्मकार महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ यांना उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्राच्या प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेंशन  योजना यावर विशेष भर दिला जात आहे.बँकांनी कर्ज वाटप करताना उद्दिष्ट पूर्त्ततेसोबत लाभार्थ्यांची संख्या वाढावी व योजना पूर्णतः राबवावी यासाठी शिखर बँकेला निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय शेतक-यांच्या हिताशी जोडल्या गेलेली जलयुक्त शिवार योजना, कृषीपंप वीज जोडणी योजना याकडे विशेष भर दिल्या जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos