मोदी सरकारच्या विरोधात चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस चे निदर्शने
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आज केंद्रातील मोदी सरकारने ईडी,सीबीआईचा गैरवापर करून विरोधी पक्षांच्या नेत्यांना खोट्या आरोपाखाली तुरुंगात टाकणे, त्यांच्या व नातेवाईकांच्या घरांवर धाडी टाकून विरोधी पक्षाच्या नेत्यांना हैराण करण्याची बेकायदेशीर सपाटा लावले आहे.
अश्याच धाडसत्रात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी गृहमंत्री आ.अनिल देशमुख, माजी मंत्री म.नवाब मलिक यांना खोट्या आरोपाखाली अकारण तुरुंगात डांबले, आणि आता आ.हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आ.जयंत पाटील यांना ईडी च्या नोटीस पाठवून हैराण करण्याचे षडयंत्र सुरू आहे, या विरुद्ध चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देवून राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत या भावना पोहचविण्याची विनंती करण्यात आली. अश्याच प्रकारचे निवेदने आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली,त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आजचा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महीला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमाणी, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, सुधाकर कातकर, प्रियदर्शन इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, सुहास बहादे, वंदन आवळे, बादल उराडे, शुभांगी साठे, बाबूभाई इसा, अनिता माउलीकर, किरण साळवी, सरस्वती गावंडे, छाया चौधरी, निर्मला नरवडे, माया देशभ्रतार, डॉ.आनंद अडबाले, शरद मानकर, माणिक लोणकर, महादेवराव पिदुरकर, दिलीप पिट्टलवार, दिगंबर दुर्योधन इत्यादी उपस्थित होते.
News - Chandrapur