महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत ९ हजार १७१ लाभार्थ्यांना थेट लाभ


- शासन आपल्या दारी या अभियानाची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ 13 मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला.
शासन आपल्या दारी अभियानात जिल्हा परिषदेमधील विविध विभागामार्फत 9 हजार 171 लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण विभाग माध्यमिक मार्फत नियमित मोफत सायकल वाटप योजनेमध्ये 5 हजार 367 लाभार्थ्यांना व शिक्षण विभाग प्राथमिक मार्फत मोफत प्रवेश, डिजीटल लायब्ररी अंतर्गत शाळांना टॅबलेटचे वाटप या योजनेमध्ये 450 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. महिला व बालकल्याण विभागामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये 133 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. पंचायत विभागामार्फत आपले सरकार सेवा कक्ष अंतर्गत 9 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण बियाने वाटप, बचत गटांना शेळी बोकड वाटप करणे, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व कुक्कुट विकास कार्यक्रम योजनेमध्ये 1 हजार 793 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत इयत्ता 8वी ते 10वी मध्ये शिक्षणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेमध्ये 1 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत योजनेमध्ये 136 लाभार्थ्यांना व आभा आय.डी.कार्ड तयार करणे योजनेमध्ये 158 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत फिरता निधी, समुदाय गुंतवणून निधी योजनेमध्ये 125 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.   


राज्यात शासन आपल्या दारी अभियानाचे जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून या अभियानाचा आढावा घेण्यात येतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश शासनाच्या योजनांचा, उपक्रमांचा लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा हा आहे. शासन आपल्या दारी अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
4 मे च्या शुध्दीपत्रकानुसार जत्रा शासकीय योजनांची या उपक्रमाचे नाव शासन आपल्या दारी करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रत्येक शासकीय विभागामार्फत लाभार्थ्यांना त्यांचे लाभ शिबीराद्वारे मिळत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची सुलभता झाली आहे. 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos