ग्रामपंचायत मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतीमधील रिक्त सदस्य व थेट सरपंच पदासाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीच्या मतदार क्षेत्रात मतदान घेण्यात येणार आहे. त्या ग्रामपंचायतींच्या मतदार क्षेत्रात मतदानाच्या दिवशी आयोजित असलेले आठवडी बाजार बंद ठेवण्यात यावे.
सदर दिवशी भरणारा आठवडी बाजार तो दिवस बदलून अन्य दिवशी भरविण्यात यावा, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha