महत्वाच्या बातम्या

 राज्यात ४ वर्षात वाघाच्या संख्येत २५ टक्यांनी वाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची संख्या २ हजार ९६७ वरून ३ हजार १६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाली आहे.

व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल मंगळवार २ मे ला झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली.





  Print






News - Rajy




Related Photos