मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांच्या मनात एक नविन उर्जा निर्माण नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : खासदार रामदास तडस
- देवळी येथे मन की बात कार्यक्रमाचे १०० व्या भागाचे थेट प्रक्षेपन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : मन की बात च्या शतकीय भागात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार देशवासियांशी व्यक्त केले. देशातील सर्व भागातून सर्व वयोगटातील लोक मन की बात या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. २०१४ ला विजयादशमीपासून सुरु झालेला प्रवास आज ऐतिहासीक व विक्रमी शतकीय भागाचे प्रसारण झालेले आहे, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आदरणीय पंतप्रधानांनी देशातील विविध समस्या तसेच महत्वाच्या विषयांवर आपले विचार देशवासियांसमोर व्यक्त केले, मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांच्या मनात एक नविन उर्जा निर्माण होते असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.
आज ३० एप्रिल २०२३ ला देवळी येथे मन की बात कार्यक्रमाचे १०० व्या भागोच थेट प्रक्षेपन देवळी येथील रामदास तडस आयटीआय येथे करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सर्व आघाडीचे अध्यक्ष, माजी न.प. सदस्य, शक्तीप्रमुख, बुथप्रमुख व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
News - Wardha