महत्वाच्या बातम्या

 विविध शासकीय योजनांशी सांगड घालण्याकरीता कृषि विभागाकडून जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे माहिती संकलन


- जिल्ह्यात स्थापन शेतकरी उत्पादक कंपन्यांना माहिती देण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ हेतू छोटे शेतकरी किंवा उत्पादक यांना एकत्रित करुन त्यांना शेतीच्या निविष्ठा जसे बियाणे, खते, कर्ज विमा व विस्तार सेवांसाठी एकत्रित करणे आणि सामूहिक विपणन प्रक्रिया आणि मुल्यवर्धनासह बाजाराभिमुख कृषि उत्पादनासाठी पुढील बाजार घटकांशी जोडणे हा आहे.

सन 2011-12 पासून केंद्र शासनाच्या कृषि, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होण्यास सुरूवात झाली. तदनंतर राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बैंक, महाराष्ट्र कृषि स्पर्धाक्षम विकास प्रकल्प, आशियाई विकास बैंक, कृषि समृद्धी योजना, 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची योजना व शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादक कंपन्यांची नोंदणी केली आहे.

राज्यात पर्यायी बाजारव्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने, सहकारासोबतच उत्पादक कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटक शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती करण्यात अग्रेसर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या चळवळीस बळकटीकरणाचे सहाय्य होत आहे. निर्मिती झालेल्या शेतकरी कंपन्या प्रामुख्याने व्यवसायाची कास घरण्यासाठी शासकीय योजनांचे सहाय्य घेत आहेत.

जिल्ह्यातील बरेचशा शेतकरी उत्पादक कंपन्या विविध शासकीय योजनांपासून दुर आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध शासकीय योजनांशी सांगड घालण्याकरीता कृषि विभागाकडे शेतकरी उत्पादकांची परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्ह्यात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली संपूर्ण माहिती नजीकच्या तालुका कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन (आत्मा) कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती  हिरळकर यांनी केले आहे.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेचा मूळ हेतू छोटे शेतकरी किंवा उत्पादक यांना एकत्रित करुन त्यांना शेतीच्या निविष्ठा जसे बियाणे, खते, कर्ज विमा व विस्तार सेवांसाठी एकत्रित करणे आणि सामूहिक विपणन प्रक्रिया आणि मुल्यवर्धनासह बाजाराभिमुख कृषि उत्पादनासाठी पुढील बाजार घटकांशी जोडणे हा आहे.

सन 2011-12 पासून केंद्र शासनाच्या कृषि, सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिनस्त लघु कृषक कृषि व्यापार संघामार्फत राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होण्यास सुरूवात झाली. तदनंतर राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बैंक, महाराष्ट्र कृषि स्पर्धाक्षम विकास प्रकल्प, आशियाई विकास बैंक, कृषि समृद्धी योजना, 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची योजना व शेतकऱ्यांनी स्वतः उत्पादक कंपन्यांची नोंदणी केली आहे.

राज्यात पर्यायी बाजारव्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने, सहकारासोबतच उत्पादक कंपनी कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांसोबतच कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राशी निगडित प्रत्येक घटक शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती करण्यात अग्रेसर आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या चळवळीस बळकटीकरणाचे सहाय्य होत आहे. निर्मिती झालेल्या शेतकरी कंपन्या प्रामुख्याने व्यवसायाची कास घरण्यासाठी शासकीय योजनांचे सहाय्य घेत आहेत.

जिल्ह्यातील बरेचशा शेतकरी उत्पादक कंपन्या विविध शासकीय योजनांपासून दुर आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध शासकीय योजनांशी सांगड घालण्याकरीता कृषि विभागाकडे शेतकरी उत्पादकांची परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्ह्यात स्थापन झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली संपूर्ण माहिती नजीकच्या तालुका कृषि अधिकारी व प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून उपलब्ध करुन देण्याचे आवाहन (आत्मा) कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती  हिरळकर यांनी केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos