३० एप्रिल ला चंद्रपूर येथे पवन भगत यांची मुलाखत
- सृजनचे ५११० दिवस आणि चर्चा, ते पन्नास दिवसांची
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : चंद्रपूर येथे ३० एप्रिल रोजी सृजनच्या १४व्या वर्षपूर्तीनिमित्त एक महिना एक कार्यक्रम अंतर्गत लेखक पवन भगत यांच्याशी एका विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर येथील न्यू इंडिया कॉन्व्हेन्ट येथे ३० एप्रिल रोजी सायं. ६.३० वाजता डॉ. काजल नेरलवार यांच्या संचालनातगर्त पार पडणार आहे.
लॉकडाऊन काळातील स्थलांतरासोबतच विविध प्रकल्प, विकासयोजनांच्या नावावर होणारे विस्थापन, युद्ध व फाळण्या इत्यादी निमित्ताने होणारे विस्थापन, दक्षिण आशियातील रोहींग्या, चकमा बौद्ध, हाजोंग हिंदू, अल्पसंख्याक प्रश्न, बांग्लादेश वा तिबेट इत्यादी निमित्ताने असलेले स्थलांतरीत व अल्पसंख्याक यांचे प्रश्न यानिमित्ताने पवन भगत यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
सदर मुलाखत ऍड. जयंत साळवे, कवी किशोर मुगल, स्थलांतरित विस्थापित अभ्यासक गीता देव्हारे रायपुरे घेणार आहेत.
News - Chandrapur