चार मोटर वाहन अपघात प्रकरणी ३२ लाखांची नुकसान भरपाई
- सुट्टीच्याही दिवशी विशेष लोक अदालत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान कार्यक्रमानुसार जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनानुसार रविवारला विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
यात मोटार वाहन अपघात प्रकरणे, भू-संपादन प्रकरणे व कौटुंबिक वाद प्रकरण असे एकूण १५० प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४ मोटर वाहन अपघात प्रकरणे निकाली काढण्यात आली असून नुकसान भरपाई ३२ लक्ष रुपये देण्यात आले. तसेच एक कौटुंबिक प्रकरण निकाली काढण्यात आले.
सदर लोक अदालतसाठी पॅनल प्रमुख म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश २, पांडुरंग भोसले तर सदस्य म्हणून वकील ए.आर. पाटील होत्या. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी उपस्थित होते.
News - Chandrapur