कर्मचार्यांनी संप त्वरीत मागे घ्यावा : सिंदेवाही तालुका सरपंच संघटना यांनी गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही : राज्य कर्मचार्यानी पुकारलेल्या संपामुळे शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प पडल्याने, जनतेचे कामकाज बंद असल्याने कर्मचार्यांचा संप तात्काळ मिटविण्यासाठी शासन स्तरावरून तात्काळ उपाययोजन करण्यात यावी या मागणीचे निवेदन सिंदेवाही तालुका सरपंच संघटना यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. संपूर्ण राज्यात मागील 3 - ४ दिवसा पासून जूनी पेंशन मिळविण्यासाठी आपल्या तालुक्यातील सर्व कर्मचारी हे संपात गेले असल्याने तालुक्यातील विविध विकास कामांना ब्रेक लागलेला आहे तालुक्यातील सर्व जिल्हा परीषद शाळा, सरकारी दवाखाने , पंचायत समीती, ग्रामपंचायत कार्यालये ओस पडली त्यामुळे नागरीकांना कामकाजात अडचनी निर्माण झाल्या आहेत.
शाळेतील मुलांचे पेपर असल्यामुळे त्याना विना शिक्षक घरी परतावे लागत आहे मागील २ वर्ष कोरोना मुळे मुलांना घरीच राहावे लागले तेव्हाही शिक्षणा पासून वंचीत रहावे लागले. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक, सचिव उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत लये काम पुर्णपने ठप्प झाले आहे. नागरीकांना आवश्यक दाखले मिळविण्यासाठी मनस्थाप सहन करावं लागत आहे. तरी शासन सरावर या संपातून आपल्या कर्मचाऱ्यांना माघार घ्यावयास लावणे व सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजु कसे करता येईल व नागरीकांना त्याच प्रमाणे लहान मुलांचा अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या हेतूने प्रयत्न करावे अशा मागणीचे निवेदन सिंदेवाही तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सिंदेवाही पंचायत समिती गट विकास अधिकारी अक्षय सुक्रे यांना देण्यात आले. आणि सदर निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद चंद्रपूर यांना माहितीस पाठविण्यात आल्या. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोडणे, संघटनेचे उपाध्यक्षा रुपाली रत्नावार यांचे सह विविध गावचे सरपंच उपस्थीत होते.
News - Chandrapur