भांडवलदारांच्या घशात खोके घालणारा अर्थसंकल्प
- जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांची प्रतिक्रिया
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आज एक रुपयांत पिक विमा हा राज्यातील शेतकऱ्यांच्या नावाने विमा कंपन्यांच्या तिजोऱ्या भरणारी ३ हजार ३०० कोटींच्या तरतूदीने शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.
तसेच लोडशेडींग करुन शेतकऱ्यांना नागवणाऱ्या सरकारने या अर्थसंकल्पात केवळ उद्योगपतींच्या हिताच्या तरतूदी केल्या जात आहेत. विद्यार्थी, बेरोजगार, कामगार, मच्छिमारांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही.
पुर्व विदर्भाला खाणींमुळे होणाऱ्या विस्थापनापलिकडे कोणताही उद्योग मिळू शकलेला नाही. एकुणच खोके सरकारने केवळ भांडवलदारांच्या घशात खोके घालणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. असे, शेकापद्वारे व्यक्त केले जात आहे.
News - Gadchiroli