महत्वाच्या बातम्या

 स्वाधार योजनेच्या अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना संपर्क साधन्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जात त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांनी ३ मार्च पर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कनिष्ठ, वरीष्ठ व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सन २०२१-२२ या वर्षासाठी महाविद्यालयांमध्ये प्रवेशित अनुसुचित जातीच्या ज्या विद्यार्थ्यांनी योजनेकरीता नुतणीकरण व नवीन अर्ज सादर केलेले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना सदर वर्षामध्ये लाभ मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांनी संपर्क साधावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी ३ मार्च पर्यंत संपर्क न साधल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल, असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद कुळकणी यांनी आवाहन केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos