महत्वाच्या बातम्या

 विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि दया जागवणारे शिक्षण हवे : सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड


- आयआयटी विद्यार्थ्याच्या आत्महत्येने सरन्यायाधीश व्यथित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : शिक्षण संस्थांमध्ये केवळ शैक्षणिक अभ्यासक्रम नको, तर विद्यार्थ्यांमध्ये प्रेम आणि दयेचा भाव निर्माण करणारे शिक्षण देण्याची गरज असल्याचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितले.

शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत संवेदनशील असले पाहिजे. भेदभावाचा थेट संबंध शिक्षण संस्थांमधील संवेदनशीलता आणि दयेच्या कमतरतेशी आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जागवण्यासाठी पावले, उचलली पाहिजेत असेही त्यांनी सांगितले.

आयआयटी संस्थांमध्ये होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत येणाऱ्या बातम्यांमुळे चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले.

या आत्महत्यांमुळे विद्यार्थ्यांमधील संवेदन- शीलतेबाबत गांभीर्याने विचार करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांत वंचीत घटकांतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या आत्महत्यांची वाढलेली संख्या केवळ घटना नसून संघर्षाच्या कथाच आहेत, असे ते म्हणाले.





  Print






News - Rajy




Related Photos