भूमिपुत्र ब्रिगेडने केली बायपास रोड बनवण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहर हे औद्यागिक शहर म्हणून प्रसिद्ध असून शहरात पेपरमिल, लाकडी डेपो, कोळसा खाण आहे. त्याची मुख्य वाहतूक शहरातून जाणाऱ्या राज्यमार्ग मधून होते. मुख्य रस्त्याला लागून शाळा, कॉलेज, नगर परिषद, दवाखाना आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरेक्षाचा प्रश्न ही गंभीर होत चालला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या अवघड वाहनाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. प्रशासनाच्या निष्काळजी व दुर्लक्षामुळे किती तरी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
यासाठी भूमिपुत्र ब्रिगेडने बायपास रोड बनवण्याची मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडचे डॉ. सौ. अभिलाषा गाऊत्रे यांनी नितीन गडकरी, केंद्रीय परिवहन मंत्री यांच्या नावाने प्रेषित करून तहसीलदार बल्लारपूर यांना निवेदन दिले. निवेदन देताना अमन पसंद बहुउद्देशीय संस्थाचे ताहेर हुसेन, सादिक शेख, सोहेब अली, सौ. प्रकृती पाटील, सौ. अफसाना सय्यद, सौ. प्रियांका चव्हाण, अविकांत नरड, संकेत झाडे इत्यादी उपस्थित होते.
News - Chandrapur