महत्वाच्या बातम्या

 विदर्भ हादरला ; गेल्या ७२ तासांतली शेतकरी आत्महत्येची चिंताजनक आकडेवारी समोर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : विदर्भातील शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय. गेल्या ७२ तासांत तब्बल ९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे विदर्भ हादरलाय. विदर्भातील अमरावती, भंडारा, यवतमाळ या या तीन जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्येची धग कायम आहे. या तीन जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांतली शेतकरी आत्महत्येची आकडेवारी डोकेदुखी वाढवणारी आहे.
गेल्या ७२ तासांत एकट्या अमरावती जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर यवतमाळमध्ये ५ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. तर भंडारा जिल्ह्यांमध्ये एका शेतकऱ्यांने आत्महत्या केली आहे. यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्यांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. यवतमाळमधील ५ अमरावतीमधील ३ आणि भंडाऱ्यातील एका शेतकऱ्यासह विदर्भातल गेल्या ७२ तासांत तब्बल ९ शेतकऱ्यांनी जीव दिला आहे .
अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पावसामुळे झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली असल्याचं सांगितले जात आहे.
आत्महत्या करणारे बहुतांश शेतकरी हे आलं, अल्पभूदारक शेतकरी असल्याचे दिसून आले. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे आलेले आर्थिक संकट कशाप्रकारे दूर करायचे,असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उच्चलेला आहे.
आत्महत्या केलेल्या चार शेतकऱ्यांनी गळफास लावून आतलं आयुष्य संपवले आहे. तर इतर शेतकऱ्यांनी किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अमरावतीलमध्ये तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल टाकलेले आहेत .
सतिश मोहोड वय ३४ राहणार खैर, सागर ढोले वय ३३ राहणार मोर्शी, मंगेश सातखेडे वय ४२ राहणार सभादा या तिघांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. तरत भंडाऱ्यात भास्कर पारधी वय ४० राहणार मंधेर, यांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. विदर्भ जनआंदोलन समितीने याबाबतची माहिती दिली आहे.






  Print






News - Amaravati




Related Photos