महत्वाच्या बातम्या

 दाट धुक्‍यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत


- तब्बल 260 हून अधिक गाड्या रद्द

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : दिल्ली व आसपासच्या भागात दाट धुक्‍यामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली असून तब्बल २६०हून अधिक रेल्वे गाड्या त्यामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. धुक्‍याची समस्या पूर्ण उत्तर भारतात भेडसावत आहे.

पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमार्गे बिहारपर्यंत पसरलेल्या धुक्‍याच्या दाट थरामुळे सोमवारी सकाळी दृश्‍यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली होती. त्यामुळे ८२ एक्‍स्प्रेस गाड्या, १४० पॅसेंजर गाड्या आणि ४०उप-शहरी गाड्यांसह एकूण २६७ ट्रेन रद्द करण्यात आल्या.

काल रविवारी धुक्‍यामुळे सुमारे ३३५ गाड्या उशिरा धावल्या, ८८ गाड्या रद्द कराव्या लागल्या तर ३१ गाड्या अन्य मार्गाकडे वळवण्यात आल्या. काल ३३ गाड्या शॉर्ट टर्मिनेट कराव्या लागल्या होत्या.





  Print






News - Rajy




Related Photos