महत्वाच्या बातम्या

 जो खेळेल तो आयुष्याची लढाई सुद्धा जिंकेल : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे


- गोंडवाना विद्यापीठात  रस्साखेच  स्पर्धेचे उद्घाटन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : संघभावानेमुळे खेळल्यामुळे सांघिक भावना वाढीस लागते. खेळात जिंकने किंवा हरणे हा विषय नसतो. टीम मध्ये कसे काम करायचे हे महत्वाचे असते कारण पुढे जाऊन नोकरी करायची आहे, अशा वेळेला टीम भावनेने खेळणे महत्वाचे असते हे कौशल्य खेळातून साध्य होणार असते . जो खेळेल तो आयुष्याची लढाई सुद्धा जिंकेल, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आतंर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेअंतर्गत रस्साखेच स्पर्धेचे उद्घाटन  करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिले.
यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अनिता लोखंडे, डॉ. शैलैंद्र गरिपुंजे उपस्थित होते. खेळांनी व्यायाम होतो, शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. खेळात आपल्या एकट्याचा विचार करून चालत नाही, संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. असे मार्गदर्शन संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग डॉ. अनिता लोखंडे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांच्या मुला-मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos