महत्वाच्या बातम्या

 झेडपीतील बदल्या होणार आता जून महिन्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मे महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारांच्या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबणीवर पडल्या आहेत. आता जून महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ग्रामविकास विभागाच्या सूचनांनुसार बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार आहेत.

दरम्यान, चालू आठवडय़ात बदलीपात्र (प्रशासकीय) आणि विनंती बदलीसाठी पात्र कर्मचारांची माहिती संकलित करण्यासाठीचे पत्र काढण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी मे महिन्यात १ ते १५ च्या दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारांच्या बदल्या होत असतात. कर्मचारांच्या बदल्यांचा विषय हा जिल्हा परिषद प्रशासनासाठी हॉट विषय असतो. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आणि पंचायतीवर प्रशासकराज असल्याने राजकीय हस्तक्षेप काही प्रमाणात कमी झाला असला, तरी पूर्णपणे थांबवलेला नाही. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीमुळे कर्मचारांच्या बदल्यांचा विषय लांबणीवर पडणार आहे.

कोरोनाकाळात अशाप्रकारे मे महिन्यात होणाऱ्या कर्मचारांच्या बदल्यांना ऑगस्ट महिना उजाडला होता. दरवर्षी कर्मचारांच्या बदल्यांची प्रक्रिया होणे आवश्यक असून, ती न राबवल्यास बदलीपात्र असणाऱ्या कर्मच्यारांवर अन्याय असल्याने ग्रामविकास विभाग कालावधी लांबला तरी बदल्यांची प्रक्रिया राबवत असल्याचे आजपर्यंत प्रशासनाचा अनुभव आहे. असे असले तरी ग्रामविकास विभाग कर्मचारांच्या बदल्यांसाठी दरवर्षी स्वतंत्रपणे आदेश काढत असतात. ग्रामविकास विभागाच्या आदेशाशिवाय बदल्या होत नाहीत. या आदेशात प्रशासकीय आणि विनंती बदल्यांचे प्रमाण राज्यपातळीवरून निश्चित करून देऊन ते राज्यातील जिल्हा परिषदेत एकसारखे राबवण्यात येते. यात साधारणपणे ५ टक्के प्रशासकीय आणि ५ टक्के विनंती बदल्या होत असतात.

नगर, शिर्डीसाठी १३ मे रोजी मतदान : 
यंदा मे महिन्यात लोकसभा निवडणूक आली आहे. १३ मे रोजी नगर जिह्यातील शिर्डी आणि नगर मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. तर राज्यात पाच टप्प्यांत मतदान झाल्यावर जून महिन्यात मतमोजणी होणार आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपणार असून, त्यानंतर १५ दिवसांत ग्रामविकास विभाग कर्मचारांच्या बदल्यांच्या धोरणाबाबत आदेश काढणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

ऑनलाइन माहिती सादर करावी लागणार : 
ऐनवेळी अडचण नको, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आताच बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करणार आहे. यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार आणि संवर्गनिहाय कर्मचाऱ्यांना त्यांची माहिती ऑनलाइन पद्धतीने सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावी लागणार आहे. ही माहिती तपासून झाल्यावर प्रशासकीय आणि विनंती बदलीसाठी पात्र असणाऱ्यांची विभागनिहाय यादी सामान्य प्रशासन विभाग तयार करणार आहे. ही माहिती भरण्याबाबतचे पत्र चालू आठवड्यात काढण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांनी दिली.





  Print






News - Rajy




Related Photos