देशातील बेरोजगारांमध्ये ८३ टक्के तरुण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतातील एकूण बेरोजगारांमध्ये तरुणांची संख्या जवळपास ८३ टक्के असून, उच्च माध्यमिक ते उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे.
देशात तरुणांना किमान १४ हजार २१८ रुपये, तर तरुणींना १६ हजार १२४ रुपये सरासरी मासिक पगारावर मिळेल ती नोकरी धरावी लागत आहे. बेरोजगारीची समस्या प्रामुख्याने शहरी भागातील सुशिक्षित तरुण आणि महिलांमध्ये वाढल्याचे समोर आले आहे.
कंत्राटी कामगार वाढले -
सध्या देशातील ९० टक्के कामगार अनौपचारिक कामात गुंतलेले आहेत. विशेषतः बिगर कृषी, संघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नोकरीमध्ये असुरक्षितता आहे. देशात कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणात वाढले असून, केवळ मोजके कर्मचारी नियमित आहेत.
News - World