नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहराला कारवा जंगल लागून असून याच परिसरात कारवा सफारी सुद्धा होत असतो, परंतु काही दिवसांपासून एका वाघाने दहशत पसरवलेली असून वाघाने दोन लोकांचे प्राण घेतले आहेत. शामराव तिडसुरवार तसेच महिला लालबच्ची रामअवध चव्हाण हे वाघाच्या हल्यात ठार झाले आहेत.
या वाघाचे बंदोबस्त करण्याकरिता संदीप गिरे, जिल्हा अध्यक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), सिक्की यादव जिल्हा उपाध्यक्ष यांचा मार्गदर्शनाखाली कैलास मोटघरे, आशिष हांडे व गौरव नाडमवार यांनी नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन जेरबंद करण्याची मागणी केले. त्यांच्या मागणी ला वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी होकार दिला आहे.
News - Chandrapur