महत्वाच्या बातम्या

 आदिवासी समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने विविध मागण्या


- आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांना निवेदन देत केली मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी विकास मंत्री विजय गावित हे चंद्रपूर दौ-यावर असतांना शासकीय विश्राम गृह येथे यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या वतीने त्यांची भेट घेण्यात आली असून आदिवासी समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध मागण्या करण्यात आल्या आहे. सदर मागण्यांचे निवेदनही यावेळी आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांना देण्यात आले आहे. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभाग जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, मनोहर मेश्राम, रंजीत मडावी, बाळू कुळमेथे, संतोष कुळमेथे आदींची उपस्थिती होती.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत किमान १५ हजार लाभार्थ्यांना शबरी आवास घरकुल योजना मंजूर करून प्रत्येक लाभार्थ्यांना 3 लाख रूपये अनुदान देण्यात यावे, शबरी आवास घरकुल योजना अंतर्गत लाभार्थ्यांना मालकी घरपट्ट्याची अट रद्द करून विशेषत शहरी भागातील नझुल जागेवर घरकुल बांधण्याची परवानगी देण्यात यावी, गरिब आदिवासी बांधवांना एम.आर.आय., सिटी स्कॅन यासारख्या महागड्या वैद्यकिय सेवा देण्याकरिता राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय दवाखाण्यात मोफत सुविधा पुरविण्यात यावी, आदिवासी विभागांतर्गत युवक युवतींना वैमानिक प्रशिक्षण, मोटार ड्रायव्हींग सारखे प्रशिक्षण तसेच ड्रोन व स्प्रेईंग टेक, बायोफ्लोक फिश टेक शेती उपयोगी आधुनिक तंत्रज्ञानाचे विशेष प्रशिक्षण मोफत देऊन परवाने देण्यात यावे, आदिवासी विद्यार्थ्यांकरिता चंद्रपूर येथे स्पर्धा परिक्षेचे (यु.पी.ए.एस्सी.) क्लासेस सुरू करण्यात यावे व प्रत्येक तालुक्यात एम.पी.ए.स्सी. क्लासेस सुरू करण्यात यावे, चंद्रपूर गडचिरोली जिल्हयातील खाजगी कंपन्यांमध्ये आदिवासी युवक युवतींना प्राध्यानाने नौकरी देण्यात यावी, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अजुनही कुठल्याही विषयाचे मूलभूत ज्ञान येत नसल्याने शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनुभवी व कार्यक्षम शिक्षकांची नेमणुक करावी, ठक्कर बाबा योजने अंतर्गत ५० टक्के लोकसंख्या असलेल्या गावालाच निधीचा लाभ दिल्या जातो. 

यामध्ये अनेक आदिवासी बांधव सदर योजनेपासून वंचित राहतात. सामाजिक न्याय विभागाकडून लाभार्थ्यांचा लोकसंख्येचा विचार न करता पुर्ण लाभ दिल्या जातात त्याच धर्तीवर आदिवासी बांधवांना लोकसंख्येचा विचार न करता ठक्कर बाबा योजनेचा पूर्ण लाभ देण्यात यावा, चंद्रपूर जिल्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये सांस्कृतिक भवनाचे बांधकाम करण्यात यावे, आदिवासींच्या पडीत असलेल्या शेतजमीनी सुपीक करण्याकरिता आदिवासी विभागाकडून योजना राबवून तसेच शेतामध्ये विहीर, बोरवेल, विद्युत पुरवठा, महाराष्ट्रातील आश्रमशाळामधील शैक्षणिक दर्जा गुणवत्तापुर्ण करून सर्व वर्ग खोल्या डिजिटल क्लासरूम करण्यात याव्यात, महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये शासकिय आदीवासी मूला-मूलींचे वसतीगृहात १००० एवढी क्षमता वाढवून स्वतंत्र इमारती उभारण्यात यावे आदी मागण्या सदर निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos