प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलेले प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले आहे. कार्डिअॅक अॅरेस्टमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५९ वर्षांचे होते. ऋतुराजचा खास मित्र व अभिनेता अमित बेहल यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
ऋतुराज यांच्या आकस्मित झालेल्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टीला धक्का बसला आहे.
अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाई, आहट, अदालत, दीया और बाती हम अशा अनेक मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. स्वादुपिंडाच्या आजारामुळे त्याला १५ दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तो घरी देखील परतला. मात्र सोमवारी अचानक त्याची तब्येत बिघडली. त्याला अशक्तपणा जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही नेत होते. मात्र रस्त्यातच त्याला कार्डिॲक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला, असे अमित बेहल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
News - Rajy