श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय येथील १२ वीच्या विद्यार्थ्याना निरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : स्थानिक श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय येथील १२ वीच्या विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्यध्यापक नंदू गोबाडे होते. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक वसंत बांगरे, प्राध्यापक ठाकरे, प्राध्यापक प्रकाश बांडे, प्राध्यापक भांडारकर आदी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक नंदू गोबाडे यांनी विद्यार्थी जीवनाविषयी मार्गदर्शन करून येणाऱ्या परीक्षामध्ये कॉपीमुक्त राहण्याकरिता मार्गदर्शन केले.
निरोप समारंभा प्रसंगी वर्ग दहावीच्या व बारावीच्या विद्यार्थ्यानी त्यांना येणारे शाळेतील अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शकांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थीनी स्वतःचा पाया मजबूत करण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत अभ्यास करून परीक्षेत यश संपादन करून भविष्यात यशस्वी व्हावे, असे आव्हान प्रकाश बांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले सहकार्य केले.
News - Gadchiroli