महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य विभागाच्यावतीने केसरीमल कन्या शाळा येथे मुख्यकार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशकाच्या गोळ्या खाऊ घालून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

यावेळी केसरीमल कन्या शाळेच्या प्राचार्य जयश्री कोटगीरवार, कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, महिला व बाल कल्याण अधिकारी सुनील मेसरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, पर्यवेक्षिका धनिष्ठा बोरुटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 19 वयोगटातील 68 टक्के  मुले असून त्यातील 28 टक्के मुलांना आतड्यामध्ये वाढणारे परजीवी जंतापासून धोका आहे. याचे प्रमुख करण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छता असणे हे आहे. या कृमीदोषाचा  संसर्ग दुषीत मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दिर्घकालीन कृमीदोष हा रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच  बालकांची बौध्दिक व शारीरीक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. भारतात 6 महिने ते 59 महिने वयोगटातील 10 बालकांमागे 7 बालकांमध्ये  रक्तक्षय आढळतो. व ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्तही असु शकते. तसेच 15 ते 19 वयोगटातील 56 टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो.

 बालकांमध्ये होणारा दिर्घकालीन कृमीदोष हा व्यापक आणि मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोष हा रक्तक्षय  आणि कुपोषणाचे कारण तर आहेच तसेच बालकांची बौध्दिक व शारीरीक वाढ खुंटण्याचे करण ठरते. यासाठी केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार राज्यात राष्ट्रीय जंतनाशक दिन वर्षातून दोनदा राबविण्यात येणार आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा 1 ते 19 वर्ष वयोगटातील सर्व मुलांमुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. जिल्ह्यातील 1 हजार 48 शासकीय शाळा, 267 शासकीय अनुदानित शाळा, 9 नगर पालिका शाळा, 215 खाजगी अनुदानित  अशा एकुण 1 हजार 539 शाळा व 1 हजार 606 अंगणवाडीतील बालकांना तसेच शहरी भागातील 135 शाळा व 150 अंगणवाडीतील 1 ते 19 वयोगटातील बालकांना व शाळाबाह्य  बालकांना जंतनाशक गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रा.ज. पराडकर यांनी केले. संचालन अंजली तिनघसे यांनी तर आभार कविता बकाले यांनी मानले. कार्यक्रमास जितेंद्र शिंदे, आरती मावकर, प्रशांत आदमने, सोज्वल उघडे, शेख हुसेन, शशिकांत अरसड, गजानन पिसे, आरोग्य विभागातील कर्मचारी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos