महत्वाच्या बातम्या

 हंसराज अहीर यांचा उर्जानगर, दुर्गापूर व शक्तीनगर परिसरात झंझावती प्रवास व जनसंपर्क 


- लोकांचा उत्स्फुर्त सहभाग : ठिकठिकाणी स्वागत सन्मान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मिशन महाविजय २०२४ चे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपाच्या गाव चलो अभियान अंतर्गत ११ फेब्रुवारी २०२४ रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या उर्जानगर, दुर्गापूर, शक्तीनगर व या परिसरातील अनेक भागांमध्ये प्रवास करुन नागरिक, नवमतदार, व्यवसायी व सर्व घटकातील लोकांशी भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख व शेकडो कार्यकर्त्यांसह गावात फिरून संवाद साधला. 

यावेळी अहीर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देवून या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भाजपाच्या आगामी राष्ट्रीय विकासाच्या संकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. हंसराज अहीर यांनी उर्जानगर वसाहतीत भेट दिल्यानंतर येथील अंगत सागर, दिपक मडावी, हनुमान काकडे, अंकीत चिकटे, पांडूरंग बोबडे व अन्य नागरिकांच्या घरी पोहचून कुटूंबिय व उपस्थित नागरीकांसोबत केंद्र व राज्यसरकारच्या सर्व समावेशक व सर्वांना न्याय देणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. 

गाव चलो अभियानात हंसराज अहीर यांचे समवेत भाजपा नेते खुशाल बोंडे, माजी जि.प. सदस्या वनिता आसुटकर, विलास टेभुर्णे, शांताराम चौखे, माजी प.स. सदस्य संजय यादव, राजु घरोटे, पुनम तिवारी, नामदेव आसुटकर, मनोज मानकर, उत्तम पाटील, ग्रा.पं. सदस्य मदन चिवंडे, सुरेंद्रसिंह, घनशाम यादव, बंडू रायपूरे, अरूणा चौधरी, श्वेता रायपूरे, अतुल पोहाणे, अवि पाटील, कांताकुमार सिंह, कुलदिप शर्मा, गीता नन्नावरे, महेंद्र रहांगडाले यांचेसह पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपाने उत्तम संघटनात्मक बांधणी व विकासाचा अजेंडा दृष्टीपथात ठेवून गावागावात या अभियानाच्या माध्यमातून भाजपाशी सर्व घटकांना जोडण्याचा संकल्प केला असून हे अभियान याच भूमिकेला समर्पित असल्याचे हंसराज अहीर सांगितले. मागील १० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती. ती आश्वासने पुर्ण करुन मोदी सरकारने लोकांच्या विश्वासाला सार्थ ठरविले असल्याचे सांगून मोदी सरकारने शेतकरी, महीला, युवक व गरीबांच्या कल्याणासाठी कार्य केले असून त्यांच्यांच नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनेल व या सर्व घटकांना न्याय मिळेल याकरीता सर्वांनी भाजपाच्या कार्यावर विश्वास ठेवून पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत मिशन महाविजय २०२४ चा संकल्प साकार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

या प्रवास दौऱ्यात अहीर यांनी दुर्गापूर व शक्तीनगर वस्तीला भेट देवून तेथील नागरीकांच्या भेटी घेतल्या दुर्गापूर येथे प्रदिप लेडांगे यांचेकडे जावून नागरीकांशी संवाद साधला. बुथ कमिटीच्या बैठकीस संबोधीत केले. दुर्गापूर येथील केसरीनंदन हनुमान मंदीरात भाविकांनी अयोध्या धामातून आणलेला प्रसाद वाटप केला. या प्रवास दौऱ्याविषयी बोलतांना अहीर यांनी सांगितले की, लोकांमध्ये मोदी सरकारविषयी प्रचंड आस्था, उत्साह व अपेक्षा आहेत. आपले कल्याण होत असल्याची भावना आहे. भविष्यात मोदीजींच्या नेतृत्वात विकास होईल ही आशा आहे. लोकांनी या अभियानात दाखविलेली उत्स्फुर्तता, दिलेला सन्मान व मोदी यांच्या सन्मानार्थ केलेल्या नारेबाजीतून सरकारविषयी आत्मीयता, देशाचा पर्यायाने कुटूंबाचा विकास होईल ही भावना वृध्दींगत झालेली अनूभवास आल्याचेही अहीर म्हणाले.





  Print






News - Chandrapur




Related Photos