भटक्या विमुक्त समाजातील नाथजोगी यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात विधानभवनावर धडकला मोर्चा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नाथजोगी हत्याकांडाची उच्च स्तरीय समिती स्थापन करा, भटकंती करण्याऱ्यांना परिचय पत्र देऊन सुरक्षा देणे, संपूर्ण भटक्या विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, आर्थिक मंडळ स्थापन करा, नाथजोगी यांची हत्या थांबवा इत्यादी मागण्यांसाठी मंगळवारी १९ डिंसेबर रोजी यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथून भटक्या विमुक्त समाजाचे नेते इंजिनिअर नारायण शिंदे, धर्मराज बाबर आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणराव बागडे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा विधानसभेवर निघाला.
मोर्चामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने नाथजोगी समाजातील महिला पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाद्धारे देण्यात आले.
News - Nagpur