महत्वाच्या बातम्या

 विसापूर गोंडवाना रेल्वे स्टेशन दोन वर्षापासुन अंधारात : रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष 


- प्रवाशांना करावा लागतो अडचणीचा सामना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर गाव सर्वात मोठे असून लोकसंख्या १७ हजारावर आहे. येथे पॅसेंजर रेल्वे गाडीचा थांबा देण्यात आला आहे. या रेल्वे स्टेशन चे नाव विसापूर गोंडवाना हाल्ट स्टेशन असे आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे हे रेल्वे स्टेशन मागील दोन वर्षांपासून अंधारात आहे.परिणामी पॅसेंजर रेल्वे प्रवाशांना अडचणीला समोरे जावे लागत आहे.

विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन वर दुपारी १२.४५ वाजता येणारी गोंदिया - बल्लारपूर,२.२० वाजता जाणारी बल्लारपूर - गोंदिया, ३.४५ वाजताची गोंदिया - बल्लारपूर ,सायंकाळी ४.४५ वाजताची जाणारी बल्लारपूर - गोंदिया व रात्री १०.३० वाजता येणारी गोंदिया - बल्लारपूर व सायंकाळी ६.३० वाजता जाणारी बल्लारपूर - वर्धा पॅसेंजर रेल्वे गाड्याचा थांबा देण्यात आला आहे.

मात्र विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन वर विद्युत व्यवस्था दोन वर्षांपासून बंद आहे. परिणामी रात्रीच्या वेळी पॅसेंजर प्रवाशांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे. विसापूर ग्रामपंचायतीने मध्य रेल्वे प्रशासनाकडे गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन वर विज खांबाला विज दिव्याची व्यवस्था करावी, म्हणून पत्र व्यवहार केला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. यामुळे गावाकऱ्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. कित्येक वर्षांपासून विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन वर पॅसेंजर रेल्वे गाड्याचा थांबा देण्यात आला आहे. परंतू रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाई मुळे येथील रेल्वे स्टेशन दोन वर्षांपासून अंधारात असल्यामुळे गावाकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर यांच्या म्हण्यानुसार  बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव सर्वात मोठे असून पॅसेंजर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील बरी आहे. रेल्वे रुळामुळे गाव विभागले आहे.

दोन वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने वाहन चालकांना सुविधा म्हणून भूमिगत मार्ग सुरु केला. मात्र आज घडीला रेल्वे अंडरपास मार्गाची पूर्णता वाट लागली आहे. सिमेंट काँक्रिट रस्ता उखडला आहे. यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. त्याच प्रमाणे विसापूर गोंडवाना हाल्ट रेल्वे स्टेशन देखील अंधारात आहे. या संदर्भात ग्राम पंचायतीने महाव्यवस्थापक मध्य रेल्वे नागपूर व दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर यांचे कडे पाठपुरावा केला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. हे दुर्भाग्य आहे. असे अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच विसापूर यांनी म्हंटले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos