महत्वाच्या बातम्या

 बौद्ध धम्माचे आचरण करून जीवनात यशस्वी व्हा : प्राचार्य डॉ.भिमराव मेश्राम यांचे प्रतिपादन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : विश्वाला शांतीचा आणी मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी विज्ञानवादी बौद्ध धम्माची स्थापना केली. या भारतरत्न,संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारून आपल्या लाखो अनुयानाना या धम्माची दीक्षा दिली. तो दीवस म्हणजे धम्मचक्र परीवर्तन दीन होय. 

डॉ. बाबासाहेब यांचेसारखा समाज घडविणारा व सामाजीक नेतृत्व करणारा मानुस जगात नाही सामाजीक परिवर्तन जागृती व मानसाला मानुस म्हणून जगण्याचा हवक डॉ आंबेडकर यांनी दिला. बौद्ध धम्मात पंचशिल अष्टांग मार्ग असुन जगात सर्वश्रेष्ठ विज्ञानवादी धम्म आहे. आणी हा धम्म प्रत्येक मानवाचे कल्यान करणारा आहे. म्हणून या विज्ञानवादी बौद्ध धम्माचे आचरण प्रत्येक मानवानी करून जीवनात यशस्वी व्हावे असे प्रतीपादन रत्नापूर येथे पार पडलेल्या धम्म चक्र परीवर्तन दिनाच्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. भिमराव मेश्राम नागपूर यांनी अध्यक्ष स्थानावरून केले.

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे बौद्ध समाज रमाबाई महीला मंडळ व रिपब्लीकन विद्यार्थी फेडरेशन शाखा रत्नापूर यांचे सयुक्त विद्यमाने हा धम्मचक्र परीवर्तन दीन कार्यक्रम सोहळा पार पडला. डॉ. बाबासाहेब यांचे पूर्णाकृती पुतळ्यास समाजाचे अध्यक्ष गौतम मेश्राम यांनी माल्यार्पन केले. त्यानंतर गावातील मुख्य मार्गाने जयभिम च्या जयघोषा सह मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुक दुर्गामाता बसस्टँड चौकात आल्यावर कृषी उत्पन्न बाजार समीती सभापती सिंदेवाही, माजी जी .प .सदस्य रमाकांत लोधे यांनी सर्वांना सरबत पाजून स्वागत केले. मिरवणुक वापस आल्यावर कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.भिमराव मेश्राम नागपूर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. निहीते, समता दुत कृपाली दडमल, माजी सरपंच सदाशीव मेश्राम, बौद्ध समाज अध्यक्ष गौतम मेश्राम, सचिव महादेव रामटेके, कोषाध्यक्ष रंजीत मेश्राम, रि. वि. फे अध्यक्ष विनोद मेश्राम, रमाबाई महीला मंडळ अध्यक्ष शिल्पा मेश्राम, सचिव शालु मेश्राम आदी मान्यवर उपस्थीत होते. 

बौद्ध विहारातील पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन प्राचार्य डॉ. भिमराव मेश्राम यांनी केले तर निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन प्रा. निहीते यांनी केले. भिमराव बन्सी मेश्राम यांनी सर्वांना बौद्ध वंदना ग्रहन केली. उपस्थीत मान्यवरानी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक माजी सरपंच सदाशीव मेश्राम यांनी केले. संचालन सत्यवान मेश्राम यांनी तर आभार धिरज मेश्राम यांनी मानलेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बौद्ध समाज रमाबाई महीला मंडळ व रि. वि. फेडरेशन शाखा रत्नापूर येथील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहकार्य केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos