महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्रात मध्य रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या चारही वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी दोन वंदे भारत ट्रेन मिळणार असून त्या मुंबई-संभाजीनगर आणि पुणे-सिकंदराबाद या मार्गावर चालवण्याचा मध्य रेल्वेचा विचार असून त्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बार्डाला पाठवला आहे.
सध्या देशात जवळपास ४० हून अधिक मार्गांवर वंदे भारत ट्रेन धावत आहेत. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पेंद्र सरकारला देशातील एकूण वंदे भारतची संख्या ७५ पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आयसीएफ फॅक्ट्रीत वंदे भारत ट्रेन बांधणीचे काम अविरतपणे सुरू आहे. त्यामुळे उपलब्ध होणाऱ्या गाड्या वेगवेळ्या मार्गावर चालवण्याची रेल्वे बोर्डाकडून चाचपणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या कोणत्या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करता येतील, अशी विचारणा केली होती.
त्यानुसार मध्य रेल्वेने मुंबई-संभाजीनगर आणि पुणे-सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. मध्य रेल्वेने सुचवलेल्या दोन मार्गांवर कधी गाड्या सुरू करायच्या याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डच घेणार आहे.
News - Rajy