महत्वाच्या बातम्या

 शासकिय कंत्राटी नोकर भरती व सरकारी शाळांच्या छुप्या खाजगीकरणा विरोधात लोककल्याणकारी समितीद्वारे १३ ऑक्टोबर ला जन आक्रोश धरणे आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील प्रत्येक गांवातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, महविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी, कंत्राटी कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामाजिक संघटना, शासकिय कर्मचारी यांचा महाराष्ट्र शासनाच्या बाहययंत्रणेमार्फत कंत्राटी नोकरभरती व शाळा खाजगीकरणा बाबतचा जाचक व अत्यंत घातक शासन निर्णयाविरुध्द एकजुटीने लोककल्याणकारी संघर्ष समिती स्थापन करून त्याद्वारे १३ ऑक्टोबर ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नगर परिषद येथे जण आक्रोश धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

६ सप्टेंबर २०२३ रोजी कंत्राटी तत्वावर नौकर भरती संदर्भात काढलेला शासन निर्णय तात्काळ रद्द, राज्यातील ६२ हजार सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण पुर्णपणे रद्द करण्यात यावे, २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करू नये व त्यांचे शहरी समुह शाळेत रूपांतर करू नये, शासनाच्या सर्व विभागातील कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचान्यांना शासकिय सेवेत कायम करण्यात यावे.
राज्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, स्थानिक स्वराज्य संस्था महामंडले सार्वजनिक क्षेत्रातील सर्व उपक्रम तथा इतर आस्थापनातील कर्मचायांची भरती M.P.S.C- महाराष्ट्र लोकसेवा आयोग या सरकारी यंत्रणेमार्फत ऑफलाईन व पारदर्शक पध्दतीने परिक्षा घेऊन कायमस्वरूपी भरती करण्यात यावी,  M.P.S.Cला परिक्षा घेण्यास भार पडत असल्यास राज्य स्तरावर M.P.S.C ला उपविभाग जोडून M.D.P. S.C- महाराष्ट्र जिल्हा लोकसेवा आयोग अशी यंत्रणा तयार करुण पारदर्शक पध्दतीने सरल सेवा भर्ती परीक्षा घेण्यात यावी, प्रत्येक ६ महिण्यात सर्वच पदांच्या शासकिय भरतीची जाहिरात M.P.S.C मार्फतच काढण्यात यावी. संविधानाने दिलेल्या संवर्ग निहाय आरक्षणानुसार सरळ सेवा भरती करण्यात यावी.

सर्व स्पर्धा परिक्षा पदांच्या परीक्षेचे शुल्क सर्व समुदायाकरीता १०० /- रुपये ठेवण्यात यावी, तसेच वनरक्षक, तलाठी, भरतीतील परीक्षेसाठी घेतलेली परिक्षा शुल्क १००० / ९०० मधुन प्रत्येक उमेदवाराला प्रतीफार्म ९०० / ८०० रुपये तात्काळ परत करण्यात यावे. I.B.P.S., T.C.S. किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या खाजगी कंपनीला परीक्षा घेण्याचे कंत्राट देऊ नये. व यापुर्वी झालेल्या सर्व ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा घोटाळ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये घोटाळा करणाच्या व्यक्तींना आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची कायदेशीर तरतुद करण्यात यावी राज्यातील सर्व समुदायांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. राज्यातील बेरोजगारांना ५,०००/- रु. प्रति महिना बेरोजगारी भत्ता देण्यात यावा.

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सर्व सेमिस्टरची फि कमी करण्यात यावी. राज्यातील अंगनवाडीचे होणारे खाजगीकरण त्वरित थांबविण्यात यावी. ग्रामिण व शहरी बेरोजगार व कामगारांना किमान २०० दिवस रोजगार उपलब्ध करून दैनिक भत्ता ६०० /- रु. देण्याबाबतची कायदेशिर तरतूद करण्यात यावी.हे मागणी घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

लोककल्याणकारी संघर्ष समिती, बल्लारपूर तालुका तसेच समर्थनार्थ सहभागी सामाजिक व शैक्षणिक संघटना, ओबीसी समन्वय समिती, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, स्वयंप्रेरित संघटना, स्टडीट्रॅक अकॅडमी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका, विसापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका, डॉ. विनायक तुमराम सार्वजनिक वाचनालय, अशफाकउल्ला खान वाचनालय, पर्यावरण संवर्धण समिती, आदिवासी उलगुलान उत्कर्ष संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स असोसिएशन गोंडवाणा विद्यापीठ सह आदी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos