महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातून निर्यांतक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करा : जिल्हाधिकारी  राहुल कर्डिले


- ईग्नाईट महाराष्ट्र कार्यक्रमाचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : उद्योग व उद्यमशिलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात आहे. या योजनांचा लाभ अधिकाअधिक उद्योजकांना मिळावा व जिल्ह्यातून निर्यांतक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ईग्नाई महाराष्ट्र कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले.      

जिल्हा उद्योग केंद्र, एमसीईडी, सीडबी व आयडीबीआय कॅपीटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने विकास भवन येथे गुंतवणुक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक एक उत्पादन यावर सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमावर ईग्नाईट महाराष्ट्र कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, अतिरिक्त डीजीएफटी डॉ.व्ही.श्रमण, मैत्रीचे नोडल अधिकारी उमेश पाटील, एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष प्रविण हिवरे, लघु उद्योग भारतीचे वैद्य, यशस्वी निर्यातदार जयसिंग थोरवे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चेतन शिरभाते, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक कमलेशकुमार जैन आदी उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रातील कित्येक वर्षापासून ताबा असलेल्या परंतू उद्योग सुरु न केलेल्या उद्योजकांकडून भूखंड परत घेऊन जिल्ह्यातील ख-या उद्योजकांना उद्योग उभारता यावा यासाठी वितरीत करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योगशिलता वाढून लघु उद्योगासोबतच कृषि प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल असेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पुढे बोलतांना म्हणाले.

जिल्ह्यातील लघु उद्योगांना  वाहतुकीसाठी समृध्दी महामार्गाचा मोठा लाभ होणार असून यामुळे कमी वेळामध्ये उत्पादीत केलेला माल मुख्य बाजारपेठेत नेण्यासाठी तसेच निर्यातीला मोठी वाव मिळणार आहे. राज्य शासनाने नुकताच मैत्री कायदा मंजूर केल्यामुळे या कायद्यांतर्गत एक खिडकी योजनेंतर्गत एकाच ठिकाणी उद्योग व्यवसायिकांना विविध विभागाच्या परवाणगी मिळणार आहे. यामुळे उद्योग व्यवसायिकांना वेगवेगळ्या विभागाच्या परवाणगीकरीता जाण्याची आवश्यकता पडणार नाही, लघु उद्योगांनी पीएमईजीपी व सीएमईजीपी योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन घेऊन आपला उद्योग सुरु करावा, असेही राहुल कर्डिले म्हणाले.

देशातील प्रत्येक राज्य आपल्या राज्याने औद्योगिक क्षेत्रात प्रगती करावी यासाठी दर पाच वर्षानी औद्योगिक धोरण तयार करीत असते. राज्यांमध्ये औद्योगिक धोरणामध्ये स्पर्धा निर्माण होत आहे. देशात महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण हे उत्कृष्ट आहे. राज्य शासनाने आता निर्यांत धोरण हाती घेतले असून राज्यातील निर्यांत वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे गजेंद्र भारती यांनी सांगितले. निर्यातीला चालना देण्यासाठी विविध व्यवसायातील १६ पॉलिसी तयार करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी क्वालिटी काऊन्सील ऑफ इंडियाचे मनिष तिवारी, ओएनडिसीचे धिरजकुमार, एफआयईओचे अक्षय शाह, एआयडीबीआय कॅपीटलचे विवेक निर्वानेश्वर, संतोष मोरे, डाक अधिक्षक गजेंद्र जाधव, सिपेटचे संचालक व प्रमुख अवनीत कुमार जोशी, हरी.एन. आठिया, यशस्वी उद्योजक जयसिंग थोरवे, अंकित गुप्ता यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिका-यांच्या हस्ते तीन उद्योजकांना ऑनलाईन निर्यात कोड प्रमाणपत्र तयार करुन वितरीत करण्यात आले.

यावेळी विविध उद्योग क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शकांनी उद्योगाबाबत व निर्यात कशी वाढविता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला  जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ज्योती भगत यांनी केले.





  Print






News - Wardha




Related Photos