भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर तीन जण जखमी
- मृतक मध्ये बल्लारपूर ची युवती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर बल्लारपूर बायपास मार्गावर बेनार रेल्वे पुलाजवळ ट्रकने आपले नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याचा कडेला पलटी झाला त्याच वेळी प्रवासाची भरलेला एक ऑटोवर ट्रक पलटला असता. या झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली असून मृतकामध्ये ऑटो चालक सहित बल्लारपूर ची युवती अनुष्का भारत खैरकर वय २२ वर्ष किल्ला वार्ड चा समावेश आहे.
चंद्रपुर शहरातील बायपास मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ एम १८१७ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेळी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक एमएच ३४ डी ८०६४ ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीत ठार झाले तर तीन लोकांना गंभीर दुखापत झाले. मृतक मध्ये अनुष्का भारत खैरकर वय २२ वर्ष रा. किल्ला वार्ड बल्लारपूर, संगीता अनिल चहांदे वय ५६ वर्ष रा. साई नगर गडचिरोली, ऑटो चालक इरफान बशीर खान वय ४९ वर्ष रा. बाबूपेठ यांचा समावेश आहे.
जखमीमध्ये राजकला राजु मोहूर्ले वय ३४ वर्ष रा. बाबुपेठ, गीता रामकृष्ण शेंडे वय ५० वर्ष रा. तुकुम , दशरथ बोबडे वय ५५ वर्ष रा. वणी यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालय दाखल केले आहे.
News - Chandrapur