जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील : नामदार धर्मरावबाबा आत्राम
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कोरची : कोरची जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगत शासनाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
कोरची तालुक्यातील विकासकामांची आढावा बैठक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, कोरची तालुका दुर्गम व डोंगराळ भागात वसला आहे. या तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत शासकीय योजना पोहोचवून तेथील नागरिकांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. शासकीय योजनांपासून एकही नागरिक वंचित राहू नये, अशी सूचना केली. सोबतच तालुक्यातील प्रलंबित विकासकामे शिघ्र गतीने मार्गी लावा, या कामांसाठी येणाऱ्या अडचणी सांगा, त्याचे निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. तर आमदार कृष्णा गजबे यांनी जनतेच्या हितासाठी शासनाने घेतलेले निर्णय लोककल्याणकारी आहेत. यासाठी उपस्थित होते.
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जाहीरात करून किंवा त्यांच्यापर्यंत जाऊन योजनांची माहिती द्यावी. राज्यातील सरकार शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे सर्वांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीला सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Gadchiroli