राजाराम येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते धान खरेदी/केंद्राचे भूमिपूजन
राजाराम येथे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते धान खरेदी/केंद्राचे भूमिपूजन
- राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आर्थिक सहकार्यामुळे राजाराम परिसरातील १५ गावांतील शेतकर्यांचा धान खरेदी/विक्री केंद्राचा (गोडाऊन) प्रश्न मार्गी लागला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : राजाराम परिसरातील सुमारे १५ गावांना धान विक्रीसाठी दुरवरच्या कमलापुर येथील केंद्रावर जावे लागत असते त्यामुळे गरीब शेतकर्यांना खुप अडचणी येतात. खुप वर्षांपासुन राजाराम येथे धान खरेदी केंद्राची मागणी प्रलंबीत होती. बर्याच तांत्रीक बाबींच्या मुद्द्यावर मागणी पुर्ण होत नव्हती परंतु राजे अम्ब्रिशराव महाराजांनी पालकमंत्री असतांना जोर लावुन धान खरेदी केंद्राला मंजुरी मिळवुन दिली होती. परंतु महसुल आणि वनविभागाकडे सोयीची जागा ऊपलब्ध नसल्याने पुन्हा जागेचा प्रश्न ऊभा ठाकला. गावकर्यांनी एकत्र येवुन पुढाकार घेतला व एक मोक्यावरची खाजगी जागा खरेदी करुन धान खरेदी केंद्रासाठी शासनाला ऊपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. परंतु समस्या सुटण्याचे नावच घेईना. जमिन मालकाला पैशाची तातडीची गरज भासली आणि गावकर्यांकडे पुरेशी रक्कम जमा झाली नव्हती, त्यामुळे जमिनीचा व्यवहार फिसकटण्याची स्थिती निर्माण झाली. कमी वेळात मोठी रक्कम गोळा करणे परिसरातील शेतकर्यांसाठी अशक्यप्राय होते. शेवटी सरपंच आणि गावातील प्रतिष्ठीत नागरीकांनी मदतीसाठी राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्याकडे धाव घेतली. राजेंनी समस्येचे गांभीर्य ओळखुन सढळ हस्ताने आर्थीक हातभार दिला त्यामुळे धान खरेदी केंद्रासाठी मोठा अडसर दुर झाला.भुमिपुजन सुध्दा राजेंच्या हस्ते व्हावे ही नागरीकांची अतीव इच्छा होती. नागरीकांच्या विनंतीला मान देऊन राजेंनी निमंत्रण स्विकारले व आज ऊत्साहात राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते भुमिपुजन सोहळा पार पडला. राजाराम ग्रा.पं.क्षेत्रातील राजाराम, सुरायपल्ली, कोंकापार व खांदला ग्रा.पं. क्षेत्रातील खांदला, पत्तीगाव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेली, रायगट्टा, गोल्लाकर्जी आणि तिमरम ग्राम पंचायत क्षेत्रातील तिमरम, गुड्डीगुडम, निम्मलगुडम इत्यादी गावांना धान खरेदी केंद्राचा लाभ होईल. यापुर्वीही पालकमंत्री असतांना राजेंनी यापरिसरात रस्त्यांचे जाळे विणले, पुल बांधुन शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवला. आता धान खरेदी केंद्राच्या सर्व समस्या मार्गी लावून शेतकर्यांचे खरे कैवारी बनले.
याप्रसंगी सुमन आलाम सरपंच ग्रामपंचायत खांदला, रविना गावडे पं. स.माजी सभापती, भास्कर तलांडे पं.स.माजी सभापती, विनायक आलम माजी सरपंच, सूर्यकांत आत्राम माजी सदस्य, मुत्ता पोरतेठ जेष्ठ कार्यकर्ता, नारायण कम्बगौनीवार, सुभाष मारगोनवार, राकेश कम्बगौनिवार, व्येंकटेश मडावी, अनिता आलम, अरविंद परकिवार, वसंत सिडाम यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्तीत होते.
News - Gadchiroli