राष्ट्रभावनेने प्रेरित व्यक्तींच्या कार्याचा सत्कारामुळे इतरानांही कार्य करण्याची प्रेरणा मिळते : खासदार रामदास तडस
- महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारत देश हा सामाजिक सांस्कृतीक व भौगोलीक दृष्ट्या विविधतेने नटलेला आहे. एवढेच नाही तर येथे सत्कारणीय अश्या नररत्नांची खान जागोजागी आढळते. अशाच गौरवस्पद कार्यकृती आणि कर्तृत्वाचा शोध घेवून अशा व्यक्तीत्वांचा परिचय व त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे काम बोधप्रद व कौतुकास्पद आहे. सत्कार हा व्यक्तीचा नसुन त्यांनी केलेल्या कार्याचा सत्कार आहे, सत्कार स्विकारल्याने केवळ कौतुकच होते असे नाही तर जबाबदारीत वाढ होते, तसेच इतरांनाही कार्य करण्याची प्रेरणा मिळते, सामाजिक दायत्वाची भावना वृद्धिंगत होते. जे कार्य आपण हाती घेतले ते अधिक जोमाने करावे ही भावना या सत्कारामागे असुन संपन्न राष्ट्रउभारणीसाठी अशी चळवळ पटवुन आणणे ही काळाचा गरज आहे, राष्ट्रभावनेने प्रेरित व्यक्तींच्या कार्याचा सत्कारामुळे इतरानांही कार्य करण्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन सासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.
ते जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था परभणी यांच्या वतीने सत्येश्वर हॉल बोरगांव (मेघे) येथे आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती जस्टीस अरूण चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, जेष्ठ समाजसेवी आर.डी. मगर (परभणी), सुनील कुमरे (मुंबई), माजी पोलिस उपआयुक्त चंद्रकांत उदगीकर, जमील अहमद ज्येष्ठ समाजसेवी के. आर. बजाज ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रिय अपाध्यक्ष इमरान राही, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष विजय सत्यम, जयहिंद सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्तार इनामदार, हाजी शेख शरीफ, राजु लभाणे, विलास कुलकर्णी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या पावन स्मशाने पुनीत झालेल्या या वर्धा नगरित अनेक मान्यवरांचा गौरव होणे ही औचित्यपूर्ण बाब आहे. असे मत जस्टीस अरूण चौधरी यांनी व्यक्त केले यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार डॉ. पंकज भोयर, इमरान राही सुनिल कुमरे, के. आर. बजाज चंद्रकति उदगीकर, आर.डी. मगर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्य अभियंता राजीव गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता विजय गालरे. डॉ. मनोज डायगव्हाने (नागपुर), मनोहर कुंभेजकर (मुंबई), सुनिल चोरडिया (पुणे), डॉ. रवि वानखेडे (नागपुर), विनय राजे (नागपुर), इंद्रजित लोनारे (नागपुर), किरण फुलझेले (नागपुर), डॉ. सैय्यद गाजी असर (उमरखेड), सुधा विरेंद्र तिवारी (अमरावती), सुनिल खराटे (अमरावती), श्रध्दा विदि (मुंबई), प्राचार्य शामिद अहमद (उस्मानाबाद), प्राचार्य सलीम हाजी अलंद (लातूर), शफी पठान (नागपुर), डॉ. अब्दुल एस. अलीम (नदिड ), डॉ. रफिउल्ला खान (औरंगाबाद), प्राचार्य वकील शेख (गडचिरोली), अनिता मसराम (नागपुर), प्रा. वैभव बोंदर (सोलापूर), किशोर वाघुले (औरंगाबाद), प्रा. अजमल शाह (जळगांव), साईनाथ पुण्ड (परभणी), सरफराज शेल (परभणी), राजेश तलमले भंडारा, कॅप्टन सय्यद मोईन (परभणी), अनंतराव कोरडे (चिंतूर), सायली अ. चव्हान (अकोला), प्रमोद अंबोरे, जयदीप कोपरेकर, रमाकांत मुंदे (परभणी), यांचा शाल श्रीफळ प्रमाणपत्र सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रास्ताविक अब्दुल सत्तार इनामदार, संचालक ॲड. इब्राहीम वस्ण आशाद प्राचार्य प्रिती सत्यम व डॉ. विद्या कळसाईत यांनी केले, उपस्थितांचे आभार के.आर.बजाज यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिहान उल्हास वाघ, सिहान मंगेश भोंगाडे, शितल शर्मा, संचाली भलमे, शबाना शेख, एहसान राही, राजेश धोपाटे, समिक्षा घोडे रजनी धावर्डे, संदीप जोशी, अमोल मानकर, भगवान वनकर, इंद्रपाल जोगे, सागर फोडेकर, अंकुश गिरडे, अश्विनी बालपछि चौताली बारई, डॉ. अभय मोहिते, रूपाली सरकाडे, आदीनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला अशोक कठाणे, इंजि मतीन नळगिरे अविनाश मुन, राजु ठग, अतुल रुईकर, यशवंत पलेरिया संघमित्रा सत्यम, ॲड. सुनिल चौधरी, डॉ. प्रदीप कश्यप आदी मान्यवर उपस्थित होते.
News - Wardha