एक दिवसीय धम्म शिबीर संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : त्रिरत्न बौद्ध महासंघ, बल्लारपुर द्वारा मिलिंद बालवाड़ी संतोषी माता वार्ड येथे आयोजित एक दिवसीय धम्म शिबीर यशस्वीपने पार पडले.
या शिबिराला मार्गदर्शक म्हणून धम्मचारी विवेकप्रभ आणि धम्मचारी संघशील, वर्धा हे उपस्थित होते. जीवन शुचिता राखने म्हणजे धम्म या विषयावर बोलताना विवेकप्रभ म्हणाले की, कुशल आणि अकुशल भावना मनातच उत्पन्न होतात, त्या सतत बदलत असतात. मनशक्तिचा वापर करून अकुशल भावनांचा उच्छेद करून आणि कुशल भावनांचा विकास करून आपन जीवनाची शुद्धता साधु शकतो.
सुरवातीला त्रिशरण, पंचशील आणि विधायक शील घेण्यात आले. धम्मचारी संघशील यांनी आनापान सति ध्यानाचे महत्व सांगितले आणि ध्यान सराव करून घेतला. कार्यक्रमाचे संचालन धम्ममित्र संध्या गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन संपत कोरडे यांनी केले. लोहेश्वर जुमडे, किशोर लोनारे आणि मनोहर दुपारे यांनी सुंदर पुजास्थान सजविले. विशेष बाब म्हणजे सतत पाऊस सुरू असताना सुद्धा मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते.
News - Chandrapur