वेतनाच्या प्रतीक्षेत कामगारांचा रेल्वे ठेका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे विभागातील संध्या कन्स्ट्रक्शन कंपनीने माणिकगड, विरूर, माकोडी, काझीपेठ, खम्मम आणि सिकंदराबाद येथे ललितपूर यूपी मधून सुमारे २०० मजुरांना बोलावून रेल्वेचे काम करून घेतले.
जवळपास २ महिने काम करून त्यांचे मजुरी चे पैसे दिले नाही. काजीपेठमध्ये पगार देण्यासाठी फोन केला, पण आला नाही, त्यानंतर काल १३ ऑगस्ट ला बल्लारशाह रेल्वे स्थानकावर फोन केला, पण इथेही न आल्याने सुमारे १०० लोक भुकेने तहानलेले ठेकेदाराच्या प्रतीक्षेत होते. ठेकेदार व सुपरवायजर चे फोन बंद होते. हे मजूर मदतीसाठी इकडे-तिकडे भटकत असून त्यांनी सर्व रेल्वे अधिकारी आणि आंध्रच्या नेत्यांना हस्तक्षेप करून त्यांचे पगार त्वरित मिळावेत, असे आवाहन केले आहे.
News - Chandrapur