महत्वाच्या बातम्या

 कार्यालय, शाळा व ग्रामपंचायतींमध्ये तिरंगा ध्वजाची उभारणी


- हर घर झेंडाचा अभियानाचा शुभारंभ

- जिल्हाभर उत्साहात ध्वज उभारणी

- ४ हजार चौरस फुटाची रांगोळी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : संपुर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या महोत्सवाच्या समारोपानिमित्य मेरी माटी, मेरा देश’हे अभियान व त्याअंतर्गत गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर झेंडा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्य जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय व ग्रामंपचायत व अंगणवाडी मध्ये आज तिरंगा ध्वज लावण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी अभियानात सहभागी झाले.

जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय तसेच १ हजार ४७९ शाळा, १ हजार ४२२ अंगणवाडी ५२१ ग्रामपंचायतीमध्ये तसेच नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून अभियाना सहभाग नोंदविला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा क्रिडा संकुल येथे ४ हजार चौरस फुट रांगोळी साकारण्यात येणार आहे. या रांगोळीमध्ये भारताचा भव्य नकाशा व महापुरुषांचे चित्र रेखाटण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुल येथे रांगोळी साकारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट पासून ते १७ ऑगस्टपर्यंत ही रांगोळी पाहण्यासाठी उपलब्ध राहणार आहे.

जनतेच्या मनात स्वातंत्र्याच्या स्मृती तेवत रहाव्या, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपुर्वक संस्मरण करण्याच्या उद्देशाने हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

हर घर तिरंगा या अभियानात पहिल्याच दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थांसह जिल्हाभर मोठा प्रतिसाद लाभला. पुढील दोन दिवस देखील नागरिकांनी या अभियानात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे, आपल्या घरावर झेंडा लावून सहभाग दाखवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos