महत्वाच्या बातम्या

 एन टी प्रवर्गाची अधिवास दाखला अट रद्द करण्याची मागणी 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : शासनाची यशवंतराव चव्हाण घरकुल योजना असून त्या योजनेत अधिवास अट लादण्यात आली आहे. ती अट रद्द करण्याची मागणी 

निषाद पार्टी जिल्हा चंद्रपूर ने केली आहे. जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर राजु लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निषाद पार्टी बल्लारपुर आणि चंद्रपुर चे शिष्ट मंडळ जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. रमाई आवास योजनेत आणि शब्बरी आवास योजनेत हि अट का नाही? असा प्रशन जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना केले आहे.

एन.टी, प्रवर्ग हा आधिच अतिशय मागासलेला आणि अशिक्षीत समाज असुन यावर कागदी बोझा का? असा प्रश्न उपस्थित करीत देश स्वतंत्र होऊन ७६ वर्ष झाले आहे. समाज राजकीय आरक्षणा पासुन वंचित आहेत. या एन,टी प्रवर्गावर किती अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी निवेदन बल्लारपुर विधानसभा महिला जिल्हा उपाध्यक्षा अल्का भोयर, इंदिरा शिकारदार, विदर्भ सचिव राजकुमार निषाद ,चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष राजू लांडगे ,चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष रामभरोसे निषाद, बल्लारपुर तालुका अध्यक्ष सुरेश केवट, उमेश निषाद बल्लारपुर, नारायण शिकारदार, चंद्रपुर महिला जिल्हा अध्यक्षा हेमलता पोईनकर, लिगल सेल महिला जिल्हा अध्यक्षा ॲड. कांचन ताई दाते, पार्वता पारशिवे, संगीता लांडगे, रमेश भोयर, महादेव भोयर, देवानंद भोयर, छत्रपती जुनघरे, अमोल जुनघरे, दौलत भोयर, वारलु ब्रामणे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos