महत्वाच्या बातम्या

 संविधानाला वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने सर्वतोपरी प्रयत्न करावे :डॉ. मेघराज कपूर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील गोटूल सभागृहात समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. मेघराज कपुर म्हणाले की, संविधानामुळे आदिवासी समाज सुरक्षित आहे शिवाय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदीमुळे आज आपली सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक आदिवासी चे कर्तव्य आहे.पुढे ते म्हणाले, आपण जसे आपल्या घरी आपल्या देवदेवतांची पुजा करतो, त्याच वेळी संविधानाजी सुध्दा पुजा करणे आवश्यक आहे. आदिवासींचे रितीरिवाज, बोलीभाषा, जीवन जगण्याची कला, संपूर्ण संस्कृती फक्त आणि फक्त संविधानामुळे सुरक्षित आहे. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी पंचायत समिती सभापती कचरीबाई काटेंगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सर्वोच्च न्यायालयातील अॅडव्होकेट बोधी रामटेके, उच्च न्यायालय नागपूर चे वकील अॅडव्होकेट श्रावण ताराम, प्रा. डॉ. मेघराज कपुर, कुमारीबाई जमकातन, प्राचार्य उमाकांत ढोक, सतीश कुसराम उपस्थित होते, प्रमुख अतिथी म्हणून राजाराम नैताम, मोहन वाढई, भिकम फुलकवर, रामसुराम काटेंगे, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, मनोज अग्रवाल, सियाराम हलामी, हिरा राउत, आशिष अग्रवाल, डॉ. शतीष गोगुलवार, शालीकराम कराडे, राष्ट्रपाल नखाते, आदी मान्यवर उपस्थित होते. 

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमात मणिपूर राज्यातील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. 

यावेळी मार्गदर्शन करताना अॅड. बोधी रामटेके म्हणाले की, भारत देशात हजारो वर्षांपासून आदिवासी समाजावर अन्याय होत आले आहे. हा समाज गरीब, अशिक्षित, भोळा आहे. त्यामुळे लोकांच्या भुलथापांना लवकर बळी पडतो. त्यामुळे शिक्षीत होणे आवश्यक आहे. शिक्षीत झाल्यावर समाजाच्या हिताचे काय आहे व काय नाही याची जाणीव होईल. बाहेरून आलेले नेते, पुढारी या आदिवासी समाजाचे नेतृत्व करीत आहेत. बाहेरील व्यक्ती आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करेल असे होवू शकत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर समाजाचे नेतृत्व समाजाच्या लोकांनीच करावे. असे म्हणाले. 

यावेळी आदिवासी समाजावर कोणत्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत, काही अंशी संविधानामुळे कशे सुरक्षित आहेत, या विषयावर सतीश कुसराम, उमाकांत ढोक, मनोज अग्रवाल,कुमारीबाई जमकातन यांनीही मार्गदर्शन केले. 

विश्व आदिवासी दिनानिमित्त सर्वप्रथम गोटूल भूमीवर या तालुक्यातील हजारोंच्या संख्येने लोक जमले. त्यानंतर रॅली च्या माध्यमातून गावातील बिरसामुंडा, राणी दुर्गावती यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर गोटूल या कार्यक्रम स्थळी समाज प्रबोधन कार्यक्रम पार पडला. 

कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसभा खुणारा, आदिवासी गोंड समाज कोरची, आदिवासी कंवर समाज क्षेत्र कोरची, आदिवासी हलबा, हलबी समाज बेळगाव, आदिवासी गोंग, गोवारी समाज कोरची, आदिवासी ध्रुव गोंड समाज कोरची, एआयएईएफ कोरची, आदिवासी विद्यार्थी संघटना कोरची केले होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामसुराम काटेंगे यांनी केले, सूत्रसंचालन रेशमा हलामी, जया मडावी तर आभारप्रदर्शन गणेश गावडे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos