महत्वाच्या बातम्या

 फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे उद्बोधन सत्राचे आयोजन 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ४ ऑगस्ट २०२३ रोजी श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारे संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे BSW Sem-I , III , V सत्र २०२३-२४ साठी उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात आले. 

सत्र २०२३ -२४ मध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना समावर्ती सराव अध्ययन अंतर्गत पूर्ण करावयाच्या अनिवार्य घटकांची माहिती विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने तथा संपूर्ण घटक कशा पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत. कुठल्या पायऱ्यांचा अवलंब करायचा तथा किती कालावधीत हे सर्व घटक पूर्ण करावयाचे याविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले.

उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश के. खंगार हे उपस्थित असून त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात तर आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुरेश के. खंगार यांनी उद्बोधन वर्ग हे विद्यार्थ्यांच्या सर्व संकल्पना स्पष्ट करून त्यांना पुढील कार्य करण्यासाठी योग्य दिशादर्शनाचे कार्य करत असते. समाजकार्य अभ्यासक्रम असा अभ्यासक्रम आहे की याच्या आधारे समाजातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठीचे तंत्र कौशल्य समाज कार्यकर्त्याला अवगत करण्याचे माध्यम उद्बोधन वर्ग आहे, त्यामुळे आपण सर्व सत्रांना सकारात्मक प्रतिसाद देऊन या  सत्रअंतर्गत आवश्यक असलेल्या समवर्ती सराव अध्ययनाच्या  सर्व घटकांचा अभ्यास या उद्बोधन वर्गाच्या माध्यमातून करावा आणि आपल्यातील कौशल्याचा, ज्ञानाचा विकास करून समाज कार्यकर्ता बनण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे असे मत व्यक्त केले. तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट सदस्य तथा प्रबंधन समिती सदस्य डॉ.विवेक गोर्लावार हे उपस्थित असून त्यांनी आपल्या मार्गदर्शनात समाज कार्याची क्षेत्रे आणि भविष्यातील संधी कोणत्या आहे. समाज कार्याच्या विद्यार्थ्यांची क्षमता खूप मोठी असून त्यांच्यात समाज बदलण्याची ताकद आहे हे स्पष्ट करत हे क्षमता निर्माण करण्यासाठी आपल्याला समाज कार्याची कौशल्य आत्मसात करणे अनिवार्य आहे, त्या दृष्टीने उद्बोधन वर्ग अत्यंत महत्वाचा घटक आहे. कारण यामध्ये समवर्ती सराव अध्ययनाचे घटकांची परिपूर्ण माहिती देण्यात येते म्हणून आपण सर्वांनी सर्व सत्राना उपस्थित राहून कौशल्य आत्मसात करावे असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले गोंडवाना विद्यापीठ सीनेट सदस्य डॉ. रुपेंद्रकुमार गौर यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजकार्याचा अभ्यासक्रम हा समाजाचे प्रश्न सोडवून नव चेतना निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्ते घडविण्याचे कार्य पार पाडत असतो आपण सर्वांनी उद्बोधन सत्रात होणाऱ्या सर्व सत्रांमध्ये सामवर्ती सराव अध्ययनाचे घटक समजून घेतल्यास सक्षम समाज कार्यकर्ता निर्माण मदत होईल तथा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा आपला पाया मजबूत होईल असे मत व्यक्त केले. 

IQAC समन्वयक प्रा.विनोद कुकडे यांनी आपल्या मार्गदर्शनात  समाजकार्याचा अभ्यासक्रमाचे वेगळेपण समजाऊन सांगत समाजकार्याचा अभ्यासक्रम हा भविष्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त आपण सर्वांना समाजकार्याची कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे आणि हे कौशल्य आपल्याला उद्बोधन वर्गात माहिती होऊन समजून आणि प्रत्यक्ष क्षेत्र कार्यामध्ये शिकणे शक्य आहे असे मत व्यक्त केले. 

या उद्बोधन सत्रासाठी सर्व प्राध्यापक रुंद उपस्थित असून त्यांचे सुद्धा स्वागत करून परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आले त्याच्यासोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस.डब्ल्यू. भाग ०३ चा विद्यार्थी कांचावार यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुरेश कंती, प्रा. हितेश चरडे आणि प्रा. दीपक तायडे यांनी केले असून आभार प्रदर्शन  बी.एस.डब्ल्यू. भाग ०२ चा विद्यार्थी भास्कर शिवणकर यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos