महत्वाच्या बातम्या

 गोसीखुर्द धरणाचे १५ दरवाजे उघडले : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीवर बांधण्यात आलेल्या गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होत आहे.

 गोसीखुर्द धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे १५ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. या धरणामधून सध्या ६२ हजार ९३५ क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

मागील आठवड्यात जोरदार पाऊस पडल्यानंतर सर्वच्या सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामधून जवळपास दीड लाखांहून अधिक क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर पाऊस थांबल्याने ३३ पैकी ३१ दरवाजे बंद करण्यात आले होते. फक्त दोनच दरवाज्यांमधून पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला होता. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने गोसीखुर्द धरणाचे दरवाजे प्रशासनाने उघडले आहेत. 

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने आणि धापेवाडा बॅरेजचा विसर्ग वाढल्यानं गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पुढील ९ तासात धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos