महत्वाच्या बातम्या

 सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम अंतर्गत अटल वायो अभ्युदय योजना


- खा. रामदास तडस यांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री सुश्री प्रतिमा भौमिक यांचे उत्तर

- खा. रामदास तडस यांनी अतांराकिंत प्रश्न संख्या १ हजार ८६३ अंतर्गत लोकसभेत उपस्थित केला प्रश्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (वर्धा) : समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे अमूल्य योगदान ओळखून त्यांचे उत्थान करण्याचे केन्द्र सरकार ने उचलेलेले पाऊल व ज्येष्ठ नागरिकांची संख्या निश्चित करण्यासाठी सरकारने कोणतेही सर्वेक्षण केले आहे किंवा करण्याचा प्रस्ताव कोणत्या योजनांतर्गत बेघर ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमात ठेवले जात आहे, गेल्या दोन वर्षात देशातील वृद्धाश्रमांच्या देखभालीसाठी वाटप करण्यात आलेला निधी व तसेच महाराष्ट्रातील वर्धा आणि अमरावती येथे किती वृद्धाश्रम चालवले जात आहे याबाबत लोकसभेत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतारांकित प्रश्न संख्या १८६२ अंतर्गत प्रश्न उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले.

खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री सुश्री प्रतिमा भौमिक यांचे उत्तर प्राप्त झाले असुन  २०११ च्या जनगणनेनुसार, देशात एकूण १७,७३,०४० बेघर ज्येष्ठ नागरिक आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग ज्येष्ठ नागरिकांसाठी एकात्मिक कार्यक्रम अंतर्गत अटल वायो अभ्युदय योजना योजना सुरु केलेली आहे,

स्वयंसेवी संस्था / स्वयंसेवी संस्था मार्फत निराधार ज्येष्ठ नागरिकांना निवास, निवारा, पोषण, वैद्यकीय सेवा आणि मनोरंजन यांसारख्या सुविधा मोफत पुरवल्या जाव्यात यासाठी अनुदान दिले जाते, मागील दोन वर्षात देशातील अंमलबजावणी संस्थांना एकूण रु. १६५.५० कोटी देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील वर्धा येथे २ आणि अमरावती ०१ ज्येष्ठ नागरिकांच्या वृध्दाश्रमाकरिता अटल वायो अभ्युदय योजने अंतर्गत देण्यात आले असल्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री सुश्री प्रतिमा भौमिक यांनी उत्तरातुन स्पष्ट केले.  





  Print






News - World




Related Photos